खरतर आपल्यात घडणाऱ्या बदलाचा आपण
खूप गवगवा करतो
. जगाला ओरडून सांगण्या इतपत
आपल्यातील बदलाच कौतुक आपण
करत असतो . पण
निसर्ग …. त्याच्या बदलाच काय
… ? आपण
सहज बोलून जातो
" हल्ली पुर्वीसारख राहील नाही,
आमच्या काळात कस अगदी"
……. ! अखिल
मानव जातीत असंख्य
बदल होत असतात
आणि त्या बदलाचे
साधक बाधक परिणाम
सुद्धा आपल्या चर्चेत येत
असतात . मानवी आयुष्याची कमाल
मर्यादा जरी १००
वर्षे धरली . तरी
या १०० वर्षात
आपल्यात अनेक बदल
घडत असतात . अगदी
निसर्गात सुद्धा बदल घडत
असतात पण मानवी
काळाचे मूल्यमापन इथ चालत
नाही , खरतर अलीकडच्या
काही वर्षात आपल्याला
निसर्गातील बदलाची दखल घेण
क्रमप्राप्त झालय, कारण
आपल्या मानव जातीवर
त्याचे होणारे परिणाम आपल्याला दिसू
लागलेत . निसर्ग त्याच्या निर्धारित
वेळेनुसार त्याच्या बदलाच्या प्रक्रिया
अबाधित राखत असतो
किंबहुना ते निसर्ग
चक्रच आहे आणि निसर्ग नियमनासाठी ते आवश्यक
आहे , पण त्याच्या
या प्रक्रियेत आपला
हस्तक्षेप हा बहुदा
आपल्यालाच महागात पडत असल्याचे चित्र आपल्याकडे पहावयास मिळते .
निसर्गात
घडणाऱ्या बदलांचा सूक्ष्म अभ्यास
किंवा बारकाईने केलेलं
निरीक्षण सुद्धा आपल्याला निसर्गातील
विविध चमत्कारांचे गूढ
उकलण्यास नक्कीच मदत करत
. एखादी नैसर्गिक प्रक्रिया निसर्गतः
पूर्ण होण्याचे विविध
टप्पे जवळून पाहता
येण हि सुद्धा
खूप मजेची बाब
आहे .
१
सेंटी मीटर मातीचा
थर तयार होण्यास सुमारे
हजारो वर्षाचा काळ
लागतो हे सगळ्यांना
माहित आहे . पण
हि संपूर्ण प्रक्रिया
पाहण आपल्याला व्यवहारिक दृष्ट्या शक्य
नाही . पण मातीचा
थर तयार होताना
नक्की कुठली प्रक्रिया
होत असते हे
आपल्याला माहित आहे . साधारण
पणे खडकावर
बाह्य कारकांचा उदा. ऊन
, वारा , पाऊस यांचा
परिणाम होतो आणि
खडकाचा अपक्षय होऊन खडक
फुटतो , त्याचा भुगा होतो
आणि त्याचे मातीत
रुपांतरण होते मग
त्यात झाडांचा पाला
पाचोळा पडतो तो
कुजतो मग सुपीक
माती तयार होते.
हि प्रक्रिया खूप
मजेशीर आहे . एकसंध
माती तयार होण्याची
प्रक्रिया आपल्या अनुभवता येत
नसली तरी तिच्या निर्मिती प्रक्रियेतले विविध
टप्पे निश्चित पणे
आपल्याला पाहता येतात . त्यासाठी
आपण निसर्गात भटकंती
करत असताना डोळसपणे
आपल्याला भरभरून देणाऱ्या निसर्गाला
पहायला पाहिजे , मग आपल्याला
त्याच्यातील बदल निश्चित
स्वरुपात पाहायला मिळतात … अगदी
आपल्या आजूबाजूला आपल्या आवडत्या
सह्याद्रीत !!!!!
आता खडक फुटतो म्हणजे नक्की काय होत ? , खरतर दगड किंवा
खडक हा अलका कुबलच्या चित्रपटातील सुनेसारखा
निसर्गातला अत्यंत सोशिक असा घटक, खरच त्याला बिचारा म्हंटल पाहिजे . त्याच कारणही तसच आहे , उन , वारा , पाऊस आणि वाहत पाणी या बाह्यकाराकांचा सतत त्याच्यावर मारा होत असतो आणि त्यामुळे त्याची झीज
होते , पण हे सगळ काही लगेच होत नाही एखादा बेसॉल्ट ( अग्निजन्य खडक ) कणखर असतो त्याच्या तुलनेत रुपांतरीत
खडक जरा मृदू असतो. सांगण्याच तात्पर्य, खडकाच्या
गुणधर्मानुसार तो बाह्य कारकाना प्रतिसाद देत असतो आणि त्यावर त्याची झीज अवलंबून असते , निसर्गाच्या
विविधतेत आपला प्रदेश संपन्न असल्यामुळे आपल्याकडे बहुतांश विविध प्रकारचे खडक आढळतात पण त्यातल्या त्यात आपल्या कडे बेसॉल्ट ( अग्निजन्य खडक ) मोठ्या प्रमाणत आढळतो. मृदा निर्मितीमध्ये विदारण हि प्रक्रिया फार महत्वाची असते.
खडक फुटण्याची प्रक्रिया त्याला शास्त्रीय भाषेत विदारण असे म्हणतात @ कोयना नगर धरण परिसर (सातारा )
विदारण |
@@@@@@ मृदा निर्मिती
प्रक्रियेतील आणखी गमतीदार
गोष्टी पुढील भागात लवकरच …….
No comments:
Post a Comment